सांजवेळी वेलीवर पाखरू भिजू लागलं
अंगणी पावसाचं पाउल वाजू लागलं
वहिमध्ये कवितेचा उत्सव साजरा झाला
शब्दामध्ये सुरांचं गाणं भिजू लागलं
तुझ्या डोळ्यात दाटलेलं काळभोर आभाळ
सुन्या माझ्या उंबरठी तुफान होऊ लागलं
आत्म्यातून जेव्हा घुमू लागली बासरी
अस्तित्व अवघं जणू राधा होऊ लागलं
तू येणार की नाही विचारायचं कसं
तरी पायवाटेवर मन झुरु लागलं
अशीच होती कातरवेळ असाच होता पाउस
तुझं नाव आठवणीत मनात लाजू लागलं
No comments:
Post a Comment