Wednesday, 13 July 2011

सांजवेळी

सांजवेळी वेलीवर पाखरू भिजू लागलं
अंगणी पावसाचं पाउल वाजू लागलं

वहिमध्ये कवितेचा उत्सव साजरा झाला
शब्दामध्ये सुरांचं गाणं भिजू लागलं

तुझ्या डोळ्यात दाटलेलं काळभोर आभाळ
सुन्या माझ्या उंबरठी तुफान होऊ लागलं

आत्म्यातून जेव्हा घुमू लागली बासरी
अस्तित्व अवघं जणू राधा होऊ लागलं

तू येणार की नाही विचारायचं कसं
तरी पायवाटेवर मन झुरु लागलं

अशीच होती कातरवेळ असाच होता पाउस
तुझं नाव आठवणीत मनात लाजू लागलं

No comments:

Post a Comment